सगळ्यांना सुचतात कविता

सगळ्यांना सुचतात कविता
एकमेकाचा वाचून कविता
तसे(प्रत्येक) एकट्यानेच लिहतो
आपण आपली कविता
.
कुणाला वाटते कधी
रात्र काळी होवून उठते
अश्या रात्री कुणाच्या मनी
एक एक चांदणी फुटते
.
वेडेपणाची सारी वेडे
इथ साऱ्यांना वेडवतात
मन होते दर्यासागर
हे मोकाट ताफे चालवतात
.
खवळलेला समुद्र तर
मन कधी यांचे शांत
गर्तेपेक्षा खोलच खोल
यांचा मनाचा नसतो अंत
.
बारा ही महिने असतात
ऋतू यांचे फुललेले
दिवसा खेळ चालतातच
रात्री ही झोपाळे झूललेले
.
वसंतात पानगळ यांची
वैशाखात पालवी नवी
म्हणूनची कि काय म्हणतात बुवा….
“जे न देखे रवी ते ते देखे कवी”

मनोज…..१९/२/२०११
Categories: कविता संग्रह | यावर आपले मत नोंदवा

Post navigation

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog at WordPress.com. Theme: Adventure Journal by Contexture International.